स्व.आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्व.आप्पासाहेब चव्हाण सर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त स्मृती पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा पंढरपूर येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व.आप्पासाहेब चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कवी रविराज सोनार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रताप चव्हाण यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानचे कार्य तसेच कार्यक्रमाची भूमिका विशद केली. यावेळी युटोपियन शुगरचे चेअरमन उमेशराव परिचारक, पंचायत समिती पंढरपूरचे माजी सभापती वामनराव माने, ह.भ.प.मदन महाराज हरिदास, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाषराव माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीषदादा गायकवाड, श्रीमती सुवर्णा आप्पासाहेब चव्हाण आणि अमरसिंह चव्हाण या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सुलाखे हायस्कूल बार्शी येथील कलाशिक्षक रामचंद्र इकारे यांना स्व.आप्पासाहेब चव्हाण स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल उत्तरेश्वर महाविद्यालय केम येथील प्रा. डॉ. मच्छिंद्रनाथ नागरे यांना स्व.आप्पासाहेब चव्हाण स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सोलापूर येथील भालचंद्र साखरे यांना स्व.आप्पासाहेब चव्हाण स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच याप्रसंगी कु. स्वरांजली रामचंद्र वाघ (श्री.दर्लिंग विद्यामंदिर चळे) चि.शुभम संतोष राज्योपाध्याय (रांझणी विद्यामंदिर रांझणी) चि.सुमित विष्णू वाघमारे (मा.सरूबाई माने विद्यालय भटुंबरे)
कु.सोनाली परमेश्वर कोले (वामनराव माने प्रशाला भैरवनाथवाडी ना. चिंचोली) कु. अमृता दादा नलवडे (यशवंत विद्यालय पंढरपूर) कु.गायत्री सोमनाथ जाधव (कवठेकर प्रशाला नाथ चौक) कु.आर्या अनिल बहिरवाडे (क.औ.पा.विद्यालय) चि. करण गजानन वतपाल (प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय) या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना युटोपियन शुगरचे चेअरमन उमेशराव परिचारक म्हणाले की
“आजच्या काळामध्ये निस्वार्थ भावनेने समाजसेवा करणारी मंडळी दुर्मिळ होत आहेत, अशा परिस्थितीमध्ये निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्यांचा सन्मान करणारे स्व.आप्पासाहेब चव्हाण प्रतिष्ठान हे समाजाला दिशा देणारे आहे. आप्पासाहेब चव्हाण सरांनी शैक्षणिक , समाजिक व साहित्यिक क्षेत्रात जो ठसा उमटवला आहे व जे संस्कार निर्माण केले आहेत, याच गोष्टींचा वारसा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालविला जात आहे. प्रतिष्ठानचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. ” या प्रसंगी प्रमुख अतिथी ह. भ. प. मदन महाराज हरिदास, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाषराव माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीषदादा गायकवाड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने उपस्थित होते. त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी रामचंद्र इकारे व कु. सोनाली कोले यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रशांत पाटील यांनी आभार मानले तर डॉ.सचिन लादे यांनी सूत्रसंचालन केले.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.